तर गंमत अशी झाली होती की आम्ही मोमो वगैरे खाताना काढलेले फोटो बघून मॅडमना देखील त्यांचे फोटो काढून हवे होते. मग रेशमाला बोलावून ...


तर गंमत अशी झाली होती की आम्ही मोमो वगैरे खाताना काढलेले फोटो बघून मॅडमना देखील त्यांचे फोटो काढून हवे होते. मग रेशमाला बोलावून स्वतःचे आवरून घेतले आणि मी गेले तेव्हा तिथे हॉटेलच्या गच्चीवर फोटो सेशन चालू होते.

मी फार वेळ थांबलेच नाही. खाली येऊन हॉटेल काकांशी गप्पा मारल्या. थोडी थातूरमातूर खरेदी केली. तोवर ७ वाजले होते किचन चालू झाले  म्हणुन ग्रुपवर मेसेज करून सगळ्यांना खाली जेवणाच्या खोलीत यायला सांगितलेजेवण वगैरे लवकर आटोपून लवकर झोपावे, २ दिवसांचा शिणवटा घालवावा अशी इच्छा होती. 

मला वाटले होते   थोडा आराम झालाय , मनासारखे फोटो सेशन झालेय म्हणजे  मॅडम ना बरे वाटले असेल तर त्यांचा रंग उडालेला होता, त्यांना बघून मला आत्ता की थोड्या वेळाने (डॉक्टर ची गरज) हा एकच विचार मनात आला. आम्ही जेवायला ऑर्डर दिली. चाउमेन नूडल्स, व्हेज फ्राईड राइस वगैरे. पण चव आवडली नाही तरी वाया जाऊ नये असा विचार करून कमी ऑर्डर दिली होती, लागलेच तर परत ऑर्डर देता येईल नाही आवडले तर हे संपवून दुसरे मागवता येईल, अन्न आणि पैसे दोन्ही वाया जाऊ नये  इतकाच विचार या मागे होता. 

सुर्यास्त झाल्यावर हवेतला गारठा वाढला होता, त्यामुळे ताटे, चमचे पाण्याची भांडी सगळे थंड पडले होते. मॅडमना पाणी हवे होते ते देखील दुसर्‍या कोणीतरी भांड्यात काढून द्यावे अशी अपेक्षा होती. मी शक्य तेवढे डोके शांत ठेवायचा प्रयत्न करत होते. खाणे आले तसे मॅडमनी अर्ध्या पेक्षा जास्त नूडल्स स्वतःच्या ताटात वाढून घेतल्या. भात चवीपुरता हवा म्हणुन तो ही वाढून घेतला. (आठवा सत्ते पे सत्ता)

उरलेसुरलं आम्ही गरिबांनी वाटून घेतले.  त्यांनी नूडल्स चे दोन घास खाल्ले, भात चिवडला, ताट सरकवले आणि मान टेबलवर ठेवली. मी सोयीस्कर दुर्लक्ष करायचे ठरवले. आणि रेशमाला शांतपणे खायला सांगितले. मैत्रीच्या गोंडस नावाखाली तिची होणारी फरफट पाहवत नव्हती.

खरेतर उष्टे अन्न वगैरे शिष्टाचार बाजुला ठेऊन या मुलीच्या ताटात वाढलेले आम्ही घेऊ शकलो असतो पण ते तसे सांगितले जायला हवे होते. तसे झालेच नाही. 

जेवण झाल्यावर रेश्माला म्हटले आता विचार मॅडमना काय होतय ते. तो पर्यंत हॉटेल काकांनी मला खाणाखुणा करून काय होतय, डॉक्टर कडे ने वगैरे सांगून झाले होतेच.

 रेश्माचा दयाळू आवाज ऐकून मॅडम म्हणाल्या ते अन्न वाया जातेय याचे मला खूऽऽऽप वाईट वाटते आहे आणि ओक्साबोक्शी रडू लागल्या.  रेश्माला म्हणाले ताबडतोब उठ आणि तिला घेऊन दवाखाना गाठराकेश ने टांग मारल्यामुळे आमच्याकडे गाडी नव्हती कोणी बाइक वाला वगैरे मदत करू शकेल का ते पाहिले का पाहिले पण त्याचा काही उपयोग नव्हताकाकांनी दवाखाना जवळच आहे तर चालतच जा असे सुचवलेत्यामुळे रेश्मा आणि मॅडम चालतच दवाखान्यात पोचल्या.

फोटो साभार आंतरजाल 
केलॉंग चा दवाखाना हे एक अजब प्रकरण आहे. रस्त्यावरून दिसणारी मोठ्ठी प्लस ची खुण हि दुरून डोंगर साजरे हि म्हण साजरी करणारी ठरली . जुन्या रामसे चित्रपटात असायचे तशी काहीशी इमारत आहे, तळमजल्यावर राडारोडा, मोडलेले फर्निचर वगैरे. त्यातूनच पुढे एक जिना. पहिल्या मजल्यावर बर्‍यापैकी अ-अद्ययावत  वैद्यकीय सुविधा. तिथून रेश्माने फोन करून कळवले की मॅडमचा ऑक्सिजन ५५ - ६० पर्यंत खाली आलाय आणि डॉक्टर ने त्यांना आता ऑक्सिजन लावला आहे

रात्री हॉटेलचे स्वयंपाक घर ११ ला बंद होते, मेरे बच्चे १२ के बाद हि सो पाते हैं, जल्दी सुबह नाश्ता नही दे पाऊंगा असे हॉटेल काकांनी स्पष्ट सांगितले. मग त्यानुसार हॉटेलचा राहायचा आणि खाण्यापिण्याचा हिशोब करून टाकला,  तेवढाच सकाळचा एक कार्यक्रम कमी. उद्याच्या प्रवासात सोबत असावे म्हणुन आम्ही केळी, ब्रेड बटर जॅम वगैरे घेऊन ठेवले तसे तर जागोजागी खायला मिळेल याची खात्री होती पण सोबत थोडे असावं! 

८४५ ला रेश्माचा फोन आला की मॅडम ना बरे वाटतेय, पण आधीच्या अनुभवाने मी तिला म्हणाले की तिला रात्री तिथेच under medical observation राहू दे. तसेही रात्री जर emergency ची वेळ आली तर परत हॉस्पिटल गाठणे जिकरीचे होईल

केलोंग हे थोडे मोठे खेडे आहे म्हटले तर वावगे नाही. पुर्ण गावात रस्त्यावर दिवे फक्त महामार्गावर आहेत. रात्री  ८ नंतर पुर्ण सामसुम, रस्ता विचारायला  चिटपाखरू देखील नव्हते. संध्याकाळी गुंजन ज्या दुकानात खरेदी करत होती तिथे उजेड दिसला, त्या ताईने वाट कुठून जाते ते सांगितले. आम्ही काळोखात ट्रेक केल्यासारखे चाचपडत उतरत होतो. एके ठिकाणी एक नवरा बायको दिसले, त्यांना विचारले तर तो म्हणाला मी येतो दाखवायला, आणि खरंच आला तो दवाखान्याच्या अगदी जवळ पर्यंत. जवळपास २ कि.मी चालत गुंजन, पल्लवी आणि मी हॉस्पिटल ला पोचलो. डॉक्टरशी चर्चा करून तिला राहू द्यायची विनंती केली. तिच्या ऍडमिशन कार्ड वर पालक म्हणुन मी सही केली.

तोपर्यंत मॅडमच्या अंगात जोर आला होता, त्या हॉटेल पर्यंत चालत येते म्हणत होत्या. Resident डॉक्टरने चर्चेत मला स्पष्ट सांगितले होते अभी और exertion नही करे तो बेहतर है और आगे का रास्ता difficult है, इनको आप नीचे मनाली भेज दिजीए.

आता तिला परत मनालीला कसे पाठवायचे हा नवा विषय आमच्या परीक्षेत अचानक उद्भवला. पण देवाने याचे उत्तर समोरच ठेवले होते. त्याच वेळी तिथे दाखल असलेले एक कपल त्यांची ट्रीप अर्धवट सोडून परत जाणार होते ते सकाळी तिला घेऊन जाऊ शकतो असे म्हणाले.

रेश्माचा निरोप घेऊन आमची वरात हॉटेल कडे निघाली. केलॉंग जरी राष्ट्रीय महामार्गावर वसलेले असले तरी उंच सखल भागात आहे त्यामुळे परत महामार्गावर येऊन आम्ही हॉटेल मध्ये पोचेपर्यंत रात्रीचे १०३० झाले होते.

हाय अल्टीट्युड ला आमचा देखील पहिलाच दिवस होता, या सगळ्या प्रकारामुळे आम्ही तिघी आणि रेश्मा अनावश्यक थकत होतो! थकलो होतो! रेश्मा ला हॉस्पिटल मध्ये एक बेड त्यांनी उपलब्ध तर करून दिला होता पण तो कितपत comfortable होता कुणास ठाऊक. आम्ही झोपायचा प्रयत्न केला. मला शांत अशी झोप लागली नाही, रात्रीत रेशमाचा फोन आला नाही म्हणजे सगळे आलबेल असावे.

आपण जनरली बोलताना म्हणतो तीन तिगडा  काम बिगडा ... इथे तशीच परिस्थिती झालीये असे वाटत होते. कोणी तरी एकीने हॉटेल वर थांबायचे तर ती एकटी , तिच्यासोबत कोणाला थांबवावे तर हॉस्पिटल ला जाणारी एकटी! त्यामुळे तिघींची वरात हॉटेल वरून हॉस्पिटलला आणि रिटर्न!

१३ जुन २०२२

सकाळी ५४५ ला राकेश चा पहिला फोन आला, त्याला म्हणाले बाबा रे थोडा उशिराने ये. त्याचे म्हणणे होते की जलदी निकलेंगे  तो जलदी पहुंचेंगे... मी म्हणाले निकल पाये तो पहुंचेंगे! त्याला काही सांगायच्या परिस्थितीमध्ये नव्हतेच. फोन बंद केला आणि परत थोडा वेळ झोपले. पण तो बिचारा डिझेल भरून हॉटेल खाली येऊन थांबला. अखेरीस  ६३० ला आम्ही उठलोच. गुंजनला हॉस्पिटलात पाठवून रेशमाला बोलावून घेतलेहॉटेलला परत आल्यावर रेश्मा ने आवरले, बॅग परत नीट पॅक केली, मॅडमची पण बॅग नीट पॅक केली. मी देखील आवरले आणि आम्ही बॅग्स घेऊन हॉस्पिटलमध्ये जायला निघालो. गुंजनला परत पाठवून आवरून घ्यायला सांगितले 

डॉक्टर ने मॅडमचा discharge ११ नंतर होईल असे सांगितले. ११ नंतर निघून आम्ही लेह ला संध्याकाळ पर्यंत पोचू शकणार नव्हतो, व्यावसायिक दृष्ट्या मला ते परवडणारे नव्हते. तसेच भाग एक मध्ये म्हटल्या प्रमाणे आम्ही चौघीच असु, कोणाची काय स्ट्रेंग्थ आणि विकनेस आहेत याचा विचार करून प्रवासाचा प्लॅन ठरवला होता, त्यात एका व्यक्तीसाठी इतरांचे नुकसान करणे शक्य नव्हते आणि योग्य देखील नव्हते. जर या व्यक्तीची वागणुक योग्य असती तर कदाचित गोष्टी वेगळ्या हि झाल्या असत्या. माहित नाही! 

कोणाला वाटत असेल मी नैतिक दृष्ट्या चुकले तर ते वाटू दे. पण रेश्माला, मला आणि नंतर गुंजन आणि पल्लवीला जी अपमानास्पद वागणुक पावलोपावली दिली गेली याचे कार्मिक फळ त्या व्यक्तीला मिळाले असू शकेल.  I have trained myself to let go of grudges but not lessons. There is no bitterness but then one should not expect me to be sweet either. सूड भावनेने मी काही करायला जात नाही, ज्याचे मन त्याला खात असते अशीच व्यक्ती माझ्या वागण्याचा सोयीनुसार अर्थ लावत आपली energy वाया घालवत असते. 

हॉस्पिटलमध्ये मॅडमनी परत attitude दाखवलाच.  रेश्मा चार गोष्टी सांगतेय तर त्याकडे पुर्ण दुर्लक्ष करून स्वतःचे घोडे दामटवत राहिल्या. माझे डोके तापायला लागले तसे मी बॅग तशीच सोडून खाली निघून आले. पाच मिनिटांनी रेश्मा आली आणि तेव्हाच राकेश परत आम्हाला घ्यायला आला. शेवटी एकदाचे आम्ही तिथून निघालो. पुढे हॉटेलमधून पल्लवी आणि गुंजनला गाडीत घेतले आणि आम्ही लेह च्या दिशेने प्रस्थान केलेवेळ सकाळी ८३०. 

जिस्पा येईपर्यंत पहिला नंबर रेश्माने लावला आणि खाल्लेले केळ तिला उलटून पडले. मग काही वेळाने आलटून पालटून तिघी गाडी थांबवत राहिल्या. झिंगझिंग बार, बारालाचा ला, दारचा, सारचू, गाटा लूप्स , नकी ला, लाचुंग ला, कधी फोटो विश्रांती तर कधी चायपानी असे थांबत थांबत आम्ही चाललो होतो

दारचा जवळ पुल ओलांडल्यावर आम्ही एके ठिकाणी चहा नाश्त्यासाठी थांबलो तेव्हा गुंजन ला उपका आला आणि ती एका बाजुला गेली. मी पाण्याची बाटली घेऊन तिच्या जवळ गेले तर ती मला म्हणाली दूर जा, तुला नको त्रास होयला तेव्हा  मी बाटली देऊन परत आले. तेव्हा रेश्मा म्हणाली तिला त्रास होताना पण तुला त्रास होऊ नये याची काळजी होती ,तेच मी बस मध्ये रात्रभर पिशव्या देणे वारा घालणे टिश्यू देणे एवढेच काम ऑन ऑर्डर  करत होते. 

बहुतेक बारालाचा ला नंतर कोणालाही कसलाच त्रास झाला नाही . पांग येथे ना थांबता पुढे घाट चढून मुरे प्लेन्स इथे थांबावे असे राकेशचे म्हणणे होते. आता सूर्य मावळतीकडे झुकायला लागला होता, त्याला लेह ला पोचायची घाई झालीये असे वाटत होते. पण चर्चा करायची ती वेळ नव्हती. पहाटे पासून जागा असल्यामुळें तो दमला देखील असावा. हाय अल्टीट्युड ला  शक्यतोवर मी कोणालाही जास्त प्रश्न विचारणे टाळते, त्या व्यक्तीला तिची / त्याची स्पेस द्यायची, पण अखंड सावधान राहायचे! हे आज देखील पाळायचे हे मी स्वतःला बजावत होते. 

ऑफ रोड ला फसलेली गाडी, मागचे चाक पहा! 

पण तिथे एके ठिकाणी शॉर्ट कट म्हणून भाऊने गाडी ऑफ रोड ला घातली आणि फसली! त्याची थोडी चिडचिड होतेय असे वाटत होते मला पण नाईलाज होता. तिथे जवळपास एक तास वाया गेला. मी त्याला गाडी कशी काढता येईल हे सांगत होते पण अनोळखी ते हि एक मुलगी काही सल्ला देऊ शकते या गोष्टीवर त्याचा विश्वास नव्हता. शेवटी गाडी मी सांगत होते त्या पद्धतीनेच निघाली. मग आम्ही थोडे अंतर उलटे परत  पांग ला गेलो आणि थोडी पोटपूजा केली. वेळ होती दुपारचे ४३०.

तिथून निघालो आणि चांगल्या रस्त्याने वर मूरे पठरावर आलो. ही  जगातली माझी सगळ्यात आवडती जागा! 

समुद्र सपाटी पासून ४८०० मीटर उंचीवर वर सरळसोट ३५ किमी अंतराचा मक्खन रस्ता, चहूकडे उंच उठलेला लडाखचा तपकिरी हिमालय, मधुन मधुन दिसणारी तिबेटी गाढवे, पश्मिना बकऱ्या आणि ब्लू शिप ऊर्फ भरल, आणि समोर दिसणारा टॅगलाँग ला चा डोंगर... स्वप्नवत... 

पण बेजबाबदार लोक पावलोपावली आढळतात आणि काशी करतात! 

वाटेत लडाख पोलीस हायवे पॅट्रोल च्या गस्त घालणाऱ्या एका गाडीने एका पर्यटकांच्या गाडीला थांबवले होते, त्यांच्यापैकी एक जण बॉनेट वर आणि एक जण सनरूफ मधून बाहेर अशी त्यांची वरात चालली होती. तिथून पुढे २ / ३ किमी वर एक "किया" बंद पडली होती, तो बाबाजी राकेशला गाडी का फिल्टर खराब हो गया है कहाँ मिलेगा वगैरे विचारत होता. मी डोक्याला हात लावला. त्यांना मागून येणाऱ्या पोलिसांची मदत घ्यायला सांगितली (मनाली साधारण २५० किमी लेह २०० किमी!)

डेब्रिंग इथे रेश्मा 

इथे डेब्रिंग म्हणुन एक वस्ती लागते तिथे आम्ही परत एकदा टॉयलेट आणि चहा साठी थांबलो. राकेश गाडीतच बसल्या बसल्या झोपला.  त्याचे हे वागणे पाहून मला थोडे टेंशन आले. त्यामुळे निघताना इथून पुढे गाडी मी चालवते असे ठामपणे  सांगितले. त्याप्रमाणे मी गाडी चालवायला घेतली. तो निमुटपणे बाजूला जाऊन बसला. वेळ संध्याकाळचे ६३०. ( या ट्रिपमध्ये इथे गाडी चालवेन असे स्वप्नात देखील वाटले नव्हते.)



जिथून सुरुवात केली तिथून लेह शहर १६० किमी असा काहीतरी माईल स्टोन होता. आता सुर्यास्त होईल मग पुढे गाडी अंधारात चालवायची आहे ते देखील हिमालयात! नाना विचार येत होते मनात. निघाल्यावर अर्ध्या तासात टॅगलांग ला च्या डोंगरावर गाडी चढू लागली. ५३३० मीटर उंची असलेली ही खिंड देशातल्या पहिल्या पाच पासेस मध्ये आहे.

टॅगलांग ला इथे पल्लवी, मी आणि रेश्मा.    

संधिकाल होता, सुर्यास्त झाल्यामुळे हवेतला गारठा वाढायला सुरुवात झाली होती त्यात बर्फाचा पाऊस सुरू झाला. आम्ही टॅगलाँग ला ला पोचलो तेव्हा एकच गाडी तिथे थांबली होती. पण त्या लोकांचे मूड काही ठीक दिसत नव्हते, काहीतरी चिंता असावी. इतक्यात एकजण खांद्यावर एकाला घेऊन येताना दिसला.राकेश झोपला होता, गुंजन गाडीतच बसुन होती आणि रेश्मा आणि पल्लवी फोटो काढत होत्या. त्या इसमाला पाहिल्यावर मला परिस्थितीचा अंदाज आला. मदत करायची इच्छा झाली होती ती आवरली कारण या तिघींना माझ्यासकट लेह ला सुखरूप पोचवणे माझ्यासाठी जास्त गरजेचे होते. व्यावसायिक दृष्ट्या सकाळी पुढच्या ट्रिप चे मेंबर्स यायच्या आधी मी लेह मध्ये पोचणे आवश्यक होते. त्यामुळे मी त्या दोघींना ताबडतोब गाडीत बसायला सांगितले आणि आम्ही तडक निघालो.

 घड्याळावर तापमान उणे ३ सेल्शियस  दाखवत होते पण ते तेवढे होते कि कमी जास्त याची मला खात्री नाही. 

आता घाट उतरायचा होता, त्यात बर्फ आणि अंधार... बहुदा २०११ च्या गणेशोत्सवात मी गोव्याहून येताना मोलेम अभयारण्यात भर पावसात पुर्ण रात्र चिखलातून गाडी चालवत बेळगावला आणली होती त्यानंतर आत्ताच practically challenging अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

गुंजन आणि मी रामरक्षा म्हणत राहिलो. अतिशय हळू गाडी चालवत होते, पण पाहिले तर सगळेच त्याच वेगाने चालवत आहेत असे वाटले. शेवटी एकदाचा घाट संपला आणि आम्ही रूमस्तेला पोचलो. नोटिफिकेशन्स वाजू लागली तसे जिओ जम्मु काश्मिर ने आमचे लडाख मध्ये स्वागत केले आहे असे लक्षात आले ,  तिथून पहिला फोन ग्रीष्माला केलाग्रीष्मा सांगलीची आहे, आणि तिचे हॉस्टेल आहे लेह मध्ये संकर रोड लाआम्ही रात्री तिथे राहू असे ठरवून तिला आमच्यासाठी रूम्स ठेवायला सांगितल्या होत्या. पण कीलाँग च्या पुढे नेटवर्क नव्हते आणि सकाळच्या गोंधळात फोन करायचे राहून गेले होते त्यामुळे पुढचे काहीच बोलणे झाले नव्हते. तिच्याकडेच जेवायची व्यवस्था करायला सांगितले. रूमस्तेहून पुढे उपशी आणि सिंधु नदीला समांतर  रस्त्याने लेह असे सुमारे ५० किमी अंतर.

उपशी आले, चेक नाक्यावर राकेश ने कागद पत्रे आणि आमची  परमिट्स दाखवली. इथे सिंधू नदीचे पहिले दर्शन होते, इथून निघाल्यावर आपण एकदा सिंधू ओलांडतो आणि तिथपासून ती आपल्या डाव्या बाजूला  लेह शहरापर्यंत सोबत करते. 

लेहला पोचल्यावर मुंबई पुण्याहून निघणाऱ्या मंडळींची खबरबात घेतली, थोडा डाळ भात खाऊन रात्री साडेदहाच्या सुमारास आम्ही अंथरुणावर खोल्यांमध्ये पाठ टेकली. आणि झोपेच्या आधीन झालोआज एक स्वप्न थोडे का होईना पुर्ण झाले होते! रात्रभर डोळ्यांपुढे बर्फ पडत राहिला, आणि आमची गाडी लडाखच्या दिशेने जात होती! 

Rant 

लडाखच्या आधी पुरेशी नोटीस देऊन २ वेळा मीटिंग घेतली, त्या व्यक्तीने त्याला देखील यायचा उत्साह दाखवला नाही. एकदा मावशीचा वाढदिवस आहे हे कारण दिले. एक आठवडा आधी मीटिंग साठी कळवले होते तर मावशीचा अचानक जन्म झाल्यासारखा वाढदिवस आला. मीटिंग ची वेळ फक्त दीड तास होती, हि व्यक्ती जर स्वारगेट परिसरात रहात असेल तर मिटिंग बादशाहीला होती! बर आपण येणार नाहीयोत हे कळवण्याची तसदी सुद्धा घेतली नाही! 

दुसऱ्या मिटिंग च्या वेळी सगळ्यात सिनियर काकु ज्या डायरेक्ट लेह ला येणार होत्या त्यांना म्हणाली बरं झाले तुम्ही आहात, वेळ पडली तर श्रद्धाला  झापू शकाल. त्या काकुंना देखील याचे आश्चर्य वाटले होते. लडाखच्या पुर्ण टूर मध्ये सगळ्यांनी प्रचंड सहकार्य केले, त्यात या काकुंचे कौतुक करावे तेव्हढे कमीच पडेल. सहलीच्या आधी आणि दरम्यान मी दिलेल्या सुचना तंतोतंत  पाळल्या या काकुंनी, त्यांना त्रास होत असताना देखील इतरांना त्रास होऊ नये याची प्रचंड काळजी घेतली. असो. 

कोविड नंतर लडाखची ट्रिप खास असणार याची खात्री होती. ट्रिप जाहीर करताच रेश्मा ने बुकिंग केले, गुंजन म्हणाली मी पण येतेय आणि पल्लव...


कोविड नंतर लडाखची ट्रिप खास असणार याची खात्री होती. ट्रिप जाहीर करताच रेश्मा ने बुकिंग केले, गुंजन म्हणाली मी पण येतेय आणि पल्लवी सुद्धा खूप काळाने मोठा दौरा करायचा म्हणुन उत्साहात होती. 

खरेतर मनाली ते लेह या राष्ट्रीय महामार्ग ३ वर तसे तर २०१४ पासुन बऱ्याचदा जाणे झालेलं. मला अटल बोगदा बघायची अनुभवायची प्रचंड इच्छा होती. पण कोविड काळात ऑक्टोबर २०२० नंतर संधी मिळाली नव्हती आणि आता चालून आलेली संधी मला सोडायची नव्हती. या तिघी तयार आहेत म्हटल्यावर मी जरा जास्तच खुश झाले. 

 Zenith Odyssey ची ट्रिप लेह ते लेह असणार होती. पण या तिघीनी माझ्यासोबत मनाली ते लेह रोड ट्रिप करायची इच्छा दर्शवली. गुंजन योगगुरु आहे, आमच्या काही इतर ट्रिप्स झाल्यात त्यामुळे तिच्यासोबत प्रवास करणे हा आनंददायक अनुभव असेल याची खात्री होती. रेश्मा सोबत पहिलीच ट्रिप असली तरी ती ट्रेकर आहे, तिने बेसिक माउंटेनियरिंग कोर्स केला आहे त्यामुळे तिला देखील हाय अल्टीट्युड चा अनुभव आहे हि माहिती होती. तसेच वेळेनुसार अड्जस्ट करायची तिची तयारी असते त्यामुळे she will not be a burden याची खात्री होती. पल्लवीला तशी मी technically बरीच वर्षे ओळखते, अतिशय शांत आणि सुस्वभावी अशी हि मुलगी इन्ट्रोव्हर्ट आहे पण खुलली कि ग्रुप ची जान. तिच्यासोबत adventure साठी मीच उत्सुक होते. 

प्लॅन ठरला पुणे ते दिल्ली विमान प्रवास ११ जुन , दिल्ली ते मनाली रात्रभर प्रवास करून १२ जुन ला सकाळी लगेच मनाली ते किलॉंग असा टॅक्सीचा प्रवास , तिसऱ्या दिवशी किलॉंग ते लेह म्हणजे १३ जुन ला. आणि १४ जुन ला बाकी मेंबर्स लेह ला पोचतील मग लडाख ची भटकंती. तर मग आमचे ठरले त्या प्रमाणे रेश्मा ने तिचे, पल्लवीचे आणि माझे पुणे ते दिल्ली विमानाचे तिकीट बुक केले तारीख होती २४ एप्रिल २०२२. गुंजनने या सुमारासच तिचे मुंबई ते दिल्ली असे रेल्वे तिकीट काढले. मग दिल्ली मनाली अशी माझ्या आवडत्या HPTDC बसची तिकिटे काढून झाली. 

मग टॅक्सिची शोधाशोध सुरु केली. हो ना करता ३ - ४ जण तयार होते. त्यांनी सांगितलेल्या रक्कमेत एखाद दोन हजाराचा फरक होता त्यामुळे कोणाला हो सांगावे ते कळत नव्हते. मधल्या काळात केदारनाथ साठी जो ड्राइव्हर ठरवला होता त्याने बुकिंग साठी पैसे पाठवल्यावर रक्कम वाढवुन सांगितली होती, त्यामुळे माझा संभ्रम आणखी वाढला होता. 

याच गोंधळात वाढ आमच्या लडाखच्या बाकी मेंबर्स पैकी दोघींनी करायला सुरुवात केली. एकीने मला आता जमत नाहीये तर माझी बुकिंग अमाऊंट परत दे चा घोषा लावला तर दुसरीने मुंबई लेह असे बुक केलेले तिकीट नुकसान झेलून रद्द केले आणि आमच्या सोबतच लेह ला रस्त्याने येणार असे सांगितले. तिने त्या नुसार पुणे दिल्ली असे त्याच विमानाचे शेवटचे राहिलेले तिकीट आमच्यापेक्षा जवळपास दुप्पट किंमत देऊन आरक्षित केले. एखादी व्यक्ती इतकी हटवादी असू शकते हा माझा पहिलाच अनुभव नसला तरी थक्क करणारा निश्चित होता. पण हि तर फक्त सुरुवात होती. जिचे बुकिंग रद्द होत होते त्या जागी दुसरी मुलगी आली त्या दोघींच्याच रेफेरन्स ने, पण नियम तोडायचा हि नाही पण हि ब्याद तर जाऊदे म्हणुन तिला निम्मे पैसे दिले आणि पिच्छा सोडवला. 

मॅडमची एंट्री झाल्यावर त्या अजुन काय काय करू शकतात याची चुणूक त्यांनी आम्हाला दाखवायला सुरुवात केली. फेसबुकवरच्या एका कळपात दिल्ली, मनाली लेह असे प्रवासाचे ऑप्शन त्यांनी शोधले, त्याचे screenshot आम्हाला पाठवले. हिमाचल प्रदेशची एक ST बस दिल्ली ते मनाली ते लेह अशी जाते. ती आपल्या लाल परी सारखीच असते. तिकीट वाजवी दरात आणि परिस्थिती लाल परी इतकीच comfortable. या बसने प्रवास करायला माझी एरवी हरकत नसते पण पुढची ट्रीप ठरलेली होती. अंग तिंबलेले, दमछाक झालेली अश्या परिस्थितीत पुढची ट्रिप पार पाडणे अवघड झाले असते माझ्यासाठीच नव्हे तर तर इतर सर्वांसाठी देखील. मला पदोपदी पुलंची आठवण येत होती. त्यांनी प्रत्येक प्रसंगात योग्य ठरेल असे वाक्य लिहून ठेवले आहेच. 




काहीही सांगितले तरी: "मला कोणीतरी सांगितले आहे कि तो रस्ता एकदा तरी एक्सपेरियन्स करावा असा आहे तर मला देखील तुमच्या सोबत यायचे आहे" एवढे एकच वाक्य कॉन्स्टन्ट आर्ग्युमेण्ट म्हणुन पुढे येत होते.  वास्तविक पाहता, एक additional टीम मेंबर म्हणजे टॅक्सी च्या खर्चात मध्ये अजुन एक विभागणी म्हणजे आपला खर्च कमी हा स्वार्थी विचार करून आम्ही चल आमच्या सोबत असे म्हणू शकत होतो परंतु तो रस्ता इतक्या वेळा पाहिला आहे, तसेच हाय अल्टीट्युड ला काय त्रास होऊ शकतो हे माहित असल्यामुळे व माझा मुख्य उद्देश लेह ते लेह ट्रिप नीट करणे हा असल्यामुळे या मुलीने आमच्या सोबत हा प्रवास न करणे जास्त योग्य होते. या प्रवासात त्रास झाला तर मी कुठल्याही प्रकारची जबाबदारी घेणार नाही, जवळच्या मेडिकल सेंटर ला पोचवून सोडून जाईन हे देखील स्पष्ट केले. अर्थात त्रास होऊ शकतो हे सांगुन देखील इतका हटवादीपणा केल्यावर या पुढे आपण काहीही सांगायचे नाही हे मी मनाशी ठरवले. एखाद्या व्यक्तीशी मैत्री करणे आणि ती टिकवणे हि दोन्ही व्यक्तींची जबाबदारी असते. प्रसंगी वाद होतात पण त्यातला गाभा, उद्देश समजुन पुढे जायचे कि नाही हे ठरते. इथे बेसिक मैत्रीच होऊ शकत नाही हे मधल्या काळात झालेल्या फोन वर लक्षात आले. 

लडाखच्या आधी झेनिथ ओडिसी ची केदारनाथ यात्रा होती, तिथे खरेतर मलाच AMS ची लक्षणे जाणवली होती, पण अनुभव असल्यामुळे वेळेवर योग्य ती दक्षता घेऊन मी सुरक्षित परत आले. त्यामुळे लडाख ला जाताना फारसा त्रास होणार नाही याची मनात आशा होती आणि झाले पण तसेच. खरतर ग्रुप मध्ये वाढ झाली की बर्‍याच गोष्टी positively बदलतात, पण इथे येणारी नवीन व्यक्ति liability बनणार आहे हे दिसत होते. आता परतीचे दोर कापले गेल्या सारखे झाले होते. केदारबाबाला प्रार्थना करून मी लडाखची तयारी केली. 

दिल्ली विमानतळ 

होता होता ११ जुन २०२२ उजाडला आणि आम्ही पुणे विमानतळावर भेटलो. तिथे सुरक्षा तपासणी झाली आणि आमचे विस्टाराचे विमान दिल्ली कडे झेपावले. Vistara was a good experience. Ground staff and in flight attendants etc were really courteous and helpful. त्यादिवशीचे त्यांना १०० पैकी १०० मार्क. पुण्याच्या शेकोटीतून आम्ही दिल्लीच्या भट्टीत पोचलो होतो. एअरपोर्ट मेट्रो ने द्वारका ला पोचलो तिथे लाईन बदलुन ब्लू लाईनने मंडी हाऊस असा प्रवास करून आम्ही वेळेत हिमाचल भवन ला दाखल झालो. हिमाचल भवनचे कॅन्टीन देखील छान आहे. भरपुर कॉफी, खुप सारी सँडविच, ऑम्लेट आणि काही खाऊन आम्ही बस ची वाट पाहत होतो. गुंजन आली नव्हती त्यामुळे माझी घालमेल सुरु होती. त्यात मॅडम हटवादी इतके सामान घेऊन आलेल्या कि त्यांचे सामान त्यांना स्वतःला झेपत नव्हते. मैत्रीखातर रेश्माची कुतरओढ होत होती आणि आम्ही हतबल होऊन पहात होतो. 

बस लागली आणि आम्ही सामान एकत्र टाकायचे म्हणुन गुंजनची वाट पाहत होतो. मागच्या वेळच्या अनुभवाने मला खरेतर आमचे सामान सगळ्यात आत जावे असे वाटत होते पण गुंजन येईपर्यंत बाकी प्रवाश्यांचे सामान टाकून डिक्की बहुतेक भरत आली होती. पण तेवढ्यात वेळेत गुंजन आली आणि सामान आत गेले आणि आम्ही बसल्यावर बस सुटली. HPTDC च्या वोल्वो च्या बसेस अतिशय आरामदायक आहेत. दिल्लीतून निघाल्यावर चंदिगढच्या पुढे मागे या बसेस जेवणासाठी थांबतात. मला राजमा चावलची भुक बरेच दिवस लागली होतीच. इथे पोचेपर्यंतच मॅडम हटवादिंचे दोन वेळा ओकून झाले होते. मला पुढे काय होणार आहे याची जाणीव होऊ लागली होती. सगळ्यांसोबत मी आपले पोटभर खाऊन घेतले, मॅडमना डॉमस्टेल दिली, कंडक्टर कडून अजून - पिशव्या दिल्या आणि परत बस मध्ये बसण्यापुर्वी देवाला प्रार्थना केली कि निदान मनाली पर्यंत प्रवास नीट होऊ दे.


तिथून निघाल्यावर अर्ध्या तासातच मॅडमनी पुन्हा कार्यक्रम सुरु केला. बर असे हि नव्हते की त्या आणि रेश्मा खूप मागे किंवा चाकावर वगैरे बसल्यात, ड्राइवरच्या मागे पहिल्या सीट वर मी आणि पल्लवी आणि मागच्या सीट वर त्या दोघी आणि गुंजन एकटीच खूप मागे कुठेतरी. पुर्ण गाडीत केवळ २ व्यक्तींना त्रास होत होता, त्यात पहिला नंबर या मॅडमचा आणि दुसरा नंबर एक ७१ वर्षीय काकू होत्या त्यांचा होता. या काकूंना देखील कमी त्रास झाला. 

मला नियमित प्रवास करून आता कुठेही शांत झोप लागते, त्यानुसार पहाटे ३ साडेतीन ला स्वारघाट येई पर्यंत छान झोप लागली होती. तिथे खरंतर HPTDC ने एखादी टॉयलेटची सोय करावी. स्वारघाट येथे ड्राइव्हर बदलतात आणि नव्या जोमाचा गडी कामाला लागतो. इथे उतरलो तेव्हाच रेश्मा एक मिनिट देखील झोपली नाहीये हे लक्षात आले. पण तिची काय आणि कशी मदत करावी हेच मला कळले नाही. 

स्वारघाट ते पंडोह पुन्हा जवळपास ४ तास प्रवास करून थांबलो तेव्हा उजाडू लागले होते, आम्ही चहा घेतला. मॅडम आता पाणी देखील नको म्हणत होत्या. जागरण त्यात उलटीमुळे झालेलं dehydration आता त्यांना मनाली मधेच रुग्णालयात दाखल करावे लागते कि काय असे मनात येऊन गेले. सकाळी ९३० ला मनालीला पोचलो. राकेश राणा ची गाडी ठरवली होती, त्याचे फोन येऊन गेले होते पण माझा फोन मस्ती करत होता आणि आमचा कॉल कनेक्ट होत नव्हता. मग गुंजनला त्याचा नंबर देऊन बोलायला सांगितले. ११ पर्यंत निघून जिस्पा पर्यंत पोचू आणि आज तिथे राहू असा विचार होता. 

मनाली मध्ये नव्या नियमानुसार या बस आता मॉल रोड ला जात नाहीत. त्यानुसार गावाबाहेर उतरून दुसरी टॅक्सी घेऊन मॉल रोड ला पोचलो. थोडा वेळासाठी पाच जणींमध्येच अशी एकच खोली घेतली आणि आवरून घेतले. मॅडम ना आता काहीच करायचे नव्हते त्यांचे सामान पण रेश्मा आणि हॉटेल स्टाफ ने खोलीत पोचवले. इलेकट्रॉल आणि नाईलाज म्हणुन एक diamox अशी सरबराई करून आम्ही आपापले आवरले. मॅडम ना आवरायचे होते म्हणुन रेश्मानेच सगळी तयारी करून दिली अगदी टूथ ब्रश पासुन सगळी. मग राकेश चा निरोप आला कि तो टॅक्सी स्टॅन्ड वर आलाय. आम्ही निघालो सकाळी परत नाश्ता म्हणुन केवळ ब्रेड बटर खाल्ले होते. मग त्याला म्हणाले रस्त्यात थांबव खाऊ कुठेतरी, तो हो म्हणाला. 


I was already highly excited to see Atal Tunnel. तसे पाहता मला बंद जागांची भीती वाटते, claustrophobia. But it was time to challenge myself and prove it to myself that I can be better than what I was. आणि बाकी तो बोगदा बनवण्यामागे असलेली स्वर्गीय अटल जींची दृष्टी आणि मा पंतप्रधान मोदीजींची मेहनत हि कारणे मला प्रोत्साहन द्यायला होतीच. मनाली मागे पडले आणि रोहतांगच्या वाटेवर आहोत असे वाटेपर्यंतच राकेश ने गाडी कुठेतरी वळवली, आणि अचानक Atal Tunnel १४ किमी अशी मैलाची कमान दिसली. माझी excitement शिगेला पोचली. हळूहळू ट्रॅफिक धीमा झाला आणि आम्ही south पोर्टल च्या बाहेर पोचलो. राकेश म्हणाला फोटो वगैरे काढायचे असतील तर जाऊन या. नेकी और पूछ पूछ... गेलो आम्ही सगळ्या लगेचच. 


बोगद्यात थांबायची परवानगी नाही पण न थांबता फोटो व्हिडिओ काढू शकता. पुर्ण ९ किलोमीटर बोगदा आहे, थोडा जास्तच. architectural marvel!!! 

(विषयांतर: क्लिफ्टन सस्पेन्शन ब्रिज २००७, जम्मू श्रीनगर महामार्गावरचा जवाहर टनेल २००९, करबुडे बोगदा २००६ रामेश्वरम मदुराई मधला पम्बन सेतू २००२, २०११, कोलकाता मधील हावडा सेतू आणि विद्यासागर सेतू २०१२, २०१४, २०१६, मुंबईचा सी लिंक २०११ आणि आता अटल टनेल २०२२... checked! (आता प्रतीक्षा चेनाब सेतूची) (सुदूर पुर्वेकडे ब्रह्मपुत्र नदावर देखील एक नवा सेतु बांधला आहे, तो हि आहे लिस्ट मध्ये. असो! )

दुपारी १२४५ च्या आसपास 

रोहतांगमार्गे जाताना मनालीहून निघाल्यावर जवळपास ५ तासांनी सिस्सू या गावी पोचायचो ते २ तासात पोचलो होतो. मुली म्हणाल्या आत्ता लगेच नको थांबायला थोडे पुढे जाऊ. मग इंडियन ऑइल चा फेमस पेट्रोल पंप लागला तिथे एक चाय पानी  ब्रेक घेऊन परत पुढे निघालो केलॉंग ला पोचलो तेव्हा दुपारचे २३० वाजले होते. इथे मला उजव्या बाजूला थोडे खाली एक मोठे हॉस्पिटल दिसले. आम्ही जेवायला थांबलो तेव्हा मॅडम हटवादींची परिस्थिती बघून मी केलॉंग लाच राहायचा निर्णय घेतला. राकेश नाराज झाला कारण त्याने त्याच्या जीस्पा मधल्या मित्राला आमच्यासाठी जागा ठेवायला सांगून ठेवले होते. पण जीस्पामध्ये वैद्यकीय मदत कितपत मिळेल याबाबत मी साशंक होते त्यामुळे Keylong seemed better option. 

ज्या हॉटेलमध्ये जेवलो त्यांनीच जागा उपलब्ध करून दिली, पाच हि जणी २ वेगळ्या पण कनेक्टेड खोल्या मध्ये राहणार होतो. इथे देखील मॅडम तडक खोलीत जाऊन बसल्या व त्यांचे सामान आम्ही पोचवावे अशी त्यांची अपेक्षा होती. पण मी अजिबात कॉपरेशन च्या मूड मध्ये नव्हते. मी त्या बॅग्स कडे ढुंकूनही बघितले नाही. इथे देखिल रेश्मा त्यांचे सामान घेऊन खोलीत घेऊन आली. 

आम्ही जिस्पापर्यंत जाऊ मग राकेश पण त्याच्या मित्राला भेटेल असे त्याला वाटत होते पण तो प्लॅन मी हाणून पाडला होता मग बहुदा मनात तो म्हणाला मला जायचेय तर मी जातो तुम्ही बसा इकडेच, सकाळी येतो घ्यायला. पण माझ्याशी  बोलता या मुलींना सकाळी येतो इतकंच सांगुन तो निघुन गेला होता. त्याला पैसे दिले नव्हते त्यामुळे आता तो आणखी काय चमत्कार दाखवतोय हा एक विचार मनात चमकला होताच. And I wasn't expecting this! मग त्याला फोन केला तर म्हणाला मला तिकडची रूम काही आवडली नाही आणि मला मित्राला भेटायचंय! कपाळावर हात मारला आणि प्रचंड patience ठेऊन सकाळी 630 ला ये असे सांगून त्याचा निरोप घेतला.
गुंजन खरेदी करताना 

समुद्र सपाटीपासून केलॉंग ३००० मीटर च्या वर आहे, म्हणजे officially high altitude. इथे पोचल्यावर acclimitate होण्यासाठी काही नियम पाळावेच लागतात. त्यानुसार मुलींना मी थोडा आराम करू दिला पण झोपू दिले नाही. मॅडम सगळे आपल्याच तंत्राने करायला पहात होत्या, खोलीत गेल्यावर झोपल्या त्या गाढच.  साडे चार नंतर आम्ही केलॉंगचे पिटुकले गाव बघायला बाहेर पडलो. बाजूच्या एका कॅफे मध्ये कॉफी, लेमन टी, मोमोज असा टाईमपास करून आम्ही उगाच विंडो शॉपिंग करत फिरत होतो. लडाख मध्ये फक्त BSNL आणि जिओ चे पोस्टपेड नंबर चालतात पण इथे आज सगळयांचे फोन चालू होते. त्यामुळे फोनवर देखील गप्पा चालू होत्या. अचानक रेश्माला कोणाचा तरी फोन आला आणि पोरगी अदृश्य झाली, मला वाटले संदीप ने कॉल केला असेल तर रेश्मा मॅडमच्या खिदमतीला गेली होती. पुढे होणाऱ्या नाटकाची नांदी झाली होती!

संध्याकाळी कॉफी 

We reached Srinagar at about 930 in the morning on 23 June 2022. We were sore from the overnight journey in the innova. With no comfortable ...

We reached Srinagar at about 930 in the morning on 23 June 2022. We were sore from the overnight journey in the innova. With no comfortable sleep and continuous travelling for more than 10 days, I was tired. We took a quick shikara ride and checked into Asif's Houseboat at Nigeen Lake.

Nigeen lake is another big lake in Srinagar city and yet is less explored destination thus is pretty much slow and peaceful. Asif's Houseboat had three bedrooms, one dining room and one drawing room with veranda or balcony. They served us breakfast, confirmed about lunch and I went to sleep immediately. Then with a brief break for lunch, I slept throughout the daytime. In the evening we spent some time in veranda, I clicked some pictures of birds like pied kingfisher and then the dinner and done.

Apparently, Gunjan hadn't slept like me and had already managed to hire a moped for next day.

Hari Parvat as seen from Nigeen Lake

 24 June 2022

 We had breakfast and took the moped and rode off. The helmet was stinky yet was necessary. The moped was a Honda Navi, vehicle with funny looks of a motorcycle and features of a moped. Well, at least it let us commute the city and performance was fabulous. The owner, wanted my Aadhaar card as security to which we negotiated considering the places we were planning to travel and handed over my PAN card.

Our first stop was Shrimad Shankaracharya Temple. I have been visiting here since 2009. Until 2022, the tourists were not allowed to click pictures. In fact, I remember the times when we were forced to leave our mobile phones in the lockers. This time, I went for pictures. One of those that I flaunt very proudly at home. This place has different vibes, something that cannot be described in words. Shrimad Shankaracharya, the first acharya who has unparallel status of being first guru of Hinduism. He's the one who restored the studies of Vedas and came out with philosophy of Advait Siddhanta. I have always revered him, for reasons strange to me too. The moment I see his picture, I have always found myself bowing my head with eyes closed and my hands performing a namaskar. 

Well, so here we were riding to the Shankaracharya hill. There were armed army personnel at every few meters. (Mind it, just meters!) The first was passing a check post at the foot of the hill, bang opposite to Dal Lake. The ghat has a scenic, thick forest with good roads. The other drivers seemed disciplined and we were at second check post in about 10 minutes. We were stopped asked for identifications and when they realised, we were just two ladies riding on our own, they let us pass quickly. One of them said, it's good to see that two women have made it this far by themselves, we hope to see more in future. Later, we were allowed to park the vehicle near last security post as well. 


Then, final hike of 240 steps and we were at the base of Temple. People sitting and chitchatting, many of them clicking pictures and making videos and reels and Facebook live and all. It was a welcome change. I have this memory from childhood when the terrorists had threatened to destroy the temple along with pilgrims of Amarnath, well, gone are those days. 


The temple has a Shivalinga known as Jyeshteshwara, and then the small cave where Shri Adi Shankaracharya performed asceticism - Tapascharya. I was fortunate to have the entire cave by myself for more than 10 minutes and I obviously utilised the solitude to meditate. After which, I realised Gunjan was missing. Then I went and sat on one of the benches in hope of finding her in the passers and she was right behind me.

We merrily climbed down the steps, clicked few pictures and started with our long ride towards Shree Kheer Bhawani Durga Temple. The temple is located in Ganderbal, we could have avoided riding along Dal Lake but unbeknownst to me Gunjan chose this route which was about 4 kms long. Anyway!

Shree Kheer Bhawani Durga Temple, is an important temple for Kashmiri Hindus. This temple was also out of bounds for civilians and as I have heard even the defence personnel had to take permission from ministry of Defence before visiting here. We reached here at about 1330 and again the formalities of entry and the curiosity of two women riding by themselves. The SSB was deputed here and it was like entering a fortress. Here I presented my Aadhar Card for entry. Also, at the time of entry, we were told very authoritatively that there will be lunch inside and we should have it and not depend on anything else outside.

The happenings inside the temple bring goosebumps even today after 6 months. There are few moments in life when you remain spellbound and your mind never understands what happened.

We went for darshan of legendary Khir Bhavani. At the time of entry, the security personnel of Seema Suraksha Bal told us authoritatively not to eat anything anywhere outside, there will be lunch - prasad available inside. We nodded and moved in. The temple was pretty peaceful and there weren't many people. We offered puja and I sheepishly asked where we would get lunch. We were directed to Yagnashala close to the temple.

We were received and welcomed by a family of Kashmiri Pandits. They offered us lunch which consisted of bottle gourd subji - Al Yakhni, Dam Aloo, rice, moong dal, some green vegetable and khir of Rice somewhat like Payasam. It was absolute Authentic Kashmiri Cuisine. The taste was heavenly and we probably overate. We thanked them for food and left. Later on, our way out, we met one of the men who had served food to us we had a little chat. He told us he was a teacher who had repatriated to Kashmir recently and also that he is a relative of the family. The family head is a high-ranking officer of Jammu Kashmir police.


Later I realized that he was right in front of us all the time when we were having lunch and had made sure that we were served properly. There was not a single moment when his high rank had peeped in his behaviour and we were almost looked upon as "Devi". A true sense of Hindu culture: Atithi Devo Bhav| 

I am not going to put any efforts in making my mind understand any part of this entire incidence and rather just hold it close to my heart and pray Ma Kheer Bhavani to bless me memory strong enough to cherish this incidence for entire life. (This was written on that day in a Facebook post)

Upon arriving at the gate, I noticed that the lever of left side brake, the one for rear wheel was broken and it was going to be a difficult task to reach Srinagar. Also, it was Friday, so I was thinking that the shops would be closed, but the soldiers assured that we would find someone on the way to repair it. So instead wasting our time, we chose to ride slowly back to Srinagar in the hope of finding some garage on our way. About 8 kms from the temple, we found a garage. We had big tikka on heads so they guessed it right that we were returning from the temple. To avoid overindulgence from these guys, we ended up telling them about the puja we had attended and that were acquaintances of the aforesaid gentleman from Jammu Kashmir police. They quickly replaced the lever and charged mere 75. We left immediately.

From here we intended to go to Lal Chowk where Modiji had flared the Tiranga few years ago and until recently which had flaunted Pakistan's flag. Also, after the abrogation of article 370 in Aug 2019, this was my first visit to the valley. I was eager to see the changes that were brought in due to this historic decision. We reached Lal Chowk and then of course the photography. 

Now we headed back to the houseboat for yet another strange experience. We tried calling the owner of the moped but he wouldn't pick up the call. The attendant at the houseboat said not to worry and leave the moped at the spot from where we had picked up, unlocked and with the key. I didn't find it to be a good idea and brought the moped where the houseboat was anchored. In the evening we called Asif as I wanted my PAN Card back. He said there was some feud in the owner's family probably over the hired moped. He also mentioned that the guy whom we were thinking to be the owner was in fact the grandson of the actual owner of the moped and he had hired out the moped with knowledge of his grandpa and obviously grandpa was upset over the matter. It was about 10 in night when I handed over the keys and got my PAN Card which was severed. I just wanted it back and didn't want to live it in the valley.

 


Finally, the day in Srinagar ended and we were back in seclusion of our room. I packed hastily and carelessly and had plans of checking in 2 of my bags and travel with just one small carry on. 

  25 June 2022

 The cab came right on time and we left. Srinagar airport although now is an international airport has always been the one with highest security amongst all the airports that I have ever seen. The security screening happens almost a kilo meter before the airport and not the just luggage but even the vehicles going in are screened.

 For Ladakh trip, before Srinagar I had carried a big duffle bag and due to experience, I knew it was weighing in permissible limits. Upon screening, it was sealed. One yellow coloured backpack would have been additional luggage and I was willing to pay for it. I had saved time by not washing clothes including inners which I had packed somewhere and didn't recollect which bag it was. And I didn't realise that this yellow backpack was not sealed at security check. The smaller blue backpack was packed in accordance with standard carry-on norms like no sharp objects etc.

When we arrived for baggage drop off, the officer told me to take both backpacks as carry on and absent minded I agreed, Afterall it saved me a couple of thousand bucks.

From here, we bid bye to each other and went on to our terminals. At the terminal, the security officer screened and held back the yellow backpack! He said sharp objects, my worry was soiled stinky inners which could have been in this backpack. I was already filled with embarrassment when he opened the yellow backpack. He was taking out things one by one, first was my yellow top the one in pictures above, then were the olive-green pants and Thennnn... There it was... an orange-coloured pouch which had all the cutlery. I almost on top of my voice said, this is it. He gave me a funny stern look and said, that’s my job to determine. He then opened the pouch, took out a knife, a peeler and a pair of scissors and threw it in the bin behind him. scanned the backpack again and let me off. What a relief!!!

Flight was on time and I reached Delhi, spent some good 3 hours at the boarding gate and to arrive in Pune by evening.